Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 30

गण-गणतंत्र-गणपती

$
0
0

मातीला 'घटा'चा आकार लाभला. घटाकारात त्रिमिती-गोलाईदर्शक अवकाश सामावल्याचे भारतीयांना समजले. ही समज भारतीयांना स्वतःमधील कल्पकतेच्या चौथ्या मितीचे भान देणारी ठरली. कल्पकतेच्या उंचीचे परिमाण माणसाच्या आत्म्याचे समाधान करणारे हवे, असा आचार्यनिर्णय ठरला. ओघानेच जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा आणि निर्मळात्म परेश या अवकाश-टप्प्यांचे समाधान महत्त्वाचे ठरले. ते देणारी 'अवकाशाची रचना' शिवयुगाच्या तीन हजार वर्षांत खूप महत्त्वाची बनली.

हे घडून येताना 'शिव' म्हणजे आदिशक्तीचे नवे रूप ठरले. शिवप्रतीक निर्माण झाले. शिवप्रतीकाच्या चिंतनातून समाजाला 'गण' बनवणारी प्रेरणा होलिकोत्सवातून सिद्ध झाली. तिच्यातून गणतंत्राची सांस्कृतिक पायाभरणी झाली. या पायाभरणीत सुख-समाधान देण्याच्या, दुःख निवारण्याच्या, विघ्ने दूर ठेवण्याच्या इच्छेलाही प्रचंड महत्त्व आले. शिवयुगातील होलिकोत्सवाच्या प्रेरणा स्वीकारणाऱ्या गणांचे गणनायक हे सुरचनाकार, सुव्यवस्थाकार किंवा सुयंत्रणाकारांपैकीच कोणी ठरणार होते. ते तसे ठरले! गणेशजन्माची ही सांस्कृतिक जन्मकथा होती. पुराणकथांपेक्षा खूप वेगळी. लाभदायकही!

गणनायक किंवा गणपती ही संकल्पना, शिव-पार्वती संकल्पनांइतकीच आदिशक्तीस्वरूप होती. ऐहिक व आत्मिक अवकाशांना एकरूप ठेवणारी. सगुण सौंदर्यभक्तीशिवाय निर्गुण चैतन्यभक्तीपाशी पोचणे अशक्य ठरवणारी. राष्ट्रभक्तीशिवाय परमात्माभक्ती अशक्य मानणारी! यावरून 'गणतंत्र' ही संकल्पना प्रत्यक्षात येण्याआधी झालेली पायाभूत मांडणी किती प्रगल्भ, सकारात्मक, ऐक्यकारक होती याची कल्पना येऊ शकेल.
शिवयुगाअखेरच्या सुमारच्या या साऱ्या अलिखित घटना. इतिहासाच्या रूपाने नाही, तर वारशाच्या रूपाने त्या शिल्लक राहिल्या. त्याकाळी, वाढत्या लोकसंख्येसोबत समस्याही वाढताना गण-गणपती-गणतंत्रविषयक वरील धारणा किती लाभदायक ठरल्या असतील, याची कल्पना येऊ शकेल. या धारणांना आकार येताना समाजातील सज्जन-दुर्जनांमधील विराट संख्येचा विशेषत्वाने विचार झाला. त्या विराट लोकसंख्येस सज्जनांच्या, म्हणजेच सौंदर्य-चैतन्यभक्तीच्या, परिघात आणण्याचा विचार प्रबळ होता. हा समाजाला आर्यपदावर पोचवणारा विचार होता. 'आर्य बनणे' म्हणजेही सिंहावलोकन करत सौंदर्य-चैतन्यभक्तीच्या मार्गावर पुढे जाणे होते.

आज भारतात गणतंत्र आहे. पण गणांची संख्या? आकाशाएवढे मोठे प्रश्नचिन्ह बाळगणारी आहे. हे प्रश्नचिन्ह नाहीसे करण्याचा मार्ग फक्त सांस्कृतिक गणेशभक्तीचा परिघ देशात वाढवूनच सिद्ध होऊ शकतो. हा मार्ग एकूण सकारात्मकतेला चालना देणाऱ्या सुरचना-सुव्यवस्था आणि सुयंत्रणांबद्दलच्या बांधिलकीतूनच तयार व्हायला हवा. असे घडून आल्यास 'सांस्कृतिक गणेशभक्त बहुजनांची गुणवत्ताशाही' हे भारतीय गणतंत्राचे नवे रूप फार दूर नसेल!

- रवी परांजपे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 30

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>