गण, गणतंत्र, गणपती या गणेशयुगीन संज्ञा. इसवीसनपूर्व सात हजार ते इसवीसनपूर्व तीन हजार या काळातल्या! हनुमान आणि शिवयुगातील सर्व लाभदायक फलितांना परिपक्व बनवणारा तो काळ! त्या काळात भारताला दृश्य-श्राव्य सौंदर्यभक्तीच्या परिघाचे महत्त्व नव्याने पटले. हा परीघ एका बाजूने नवनिर्माण चैतन्य, तर दुसऱ्या बाजूने धर्म आणि राष्ट्रधर्म फुलवतो असे भारतीयांना समजून चुकले.
↧