Quantcast
Viewing all articles
Browse latest Browse all 30

'सुंदर' म्हणजे काय?

- रवी परांजपे

स्वतःच्या आदिशक्तीचे भान सांभाळत भारतीय माणसाने केलेला प्रवास शून्यातून सर्जनशील वैभवाकडे जाणारा.. सकारात्मकतेकडे जाणारा! या प्रवासामुळेच माणसाचा व्यक्तिस्वार्थ प्रथम स्व-कुटुंबाशी एकरूप झाला; आणि पुढे, कुटुंबस्वार्थ समाजस्वार्थाशी! अशा सकारात्मक परिस्थितीतच माणसे एकोप्याने जगू शकतात.. जीवनातील सुख-दुःखांना सामोरे जाऊ शकतात.. भीमबेटका गुंफाचित्रांसारखे सर्जनशील प्रकल्प पार पाडू शकतात.. आणि सर्जनशील सकारात्मक उपक्रमशीलतेला उपद्रव देणाऱ्याविरुद्ध प्रसंगी एकोप्याने शस्त्रही हाती घेऊ शकतात, अशी जागृती भारतीयांना आली.

अशा जागृतीचे प्रतीक ठरावे, असे एक चित्र भीमबेटकात आहे. यात अत्यंत सतर्क भासणारे दोन घुडस्वार दिसतात. त्यापैकी उजवीकडील घुडस्वार दुसऱ्याचा वरिष्ठ नायक असावा. कारण त्याच्या हातातले शस्त्र दुसऱ्याच्या शस्त्रापेक्षा अधिक जाड-जूड. शिवाय, त्या नायक घुडस्वाराच्या भोवती सुशोभित चौकट. एक प्रकारच्या नकारात्मक भूमिकेतून विचार केला, तर घुडस्वार शिपाई आणि त्याचा नायक यांमधील विषमताच ध्यानी येते. पण, सकारात्मक विचार केला, तर नायक अधिकाऱ्याच्या भोवतालची चौकट ही सैन्य नामक सुव्यवस्थेची किंवा सुयंत्रणेची साक्ष. अशावेळी शिपाई आणि त्याचा अधिकारी एकाच शिस्तीच्या कोंदणातले साथी ठरतात.. एकाच चित्रातील लहान-मोठ्या आकारांसारखे.. एकाशिवाय दुसरा निरर्थक! 'रेषा एकटी बिचारी फारसे साध्य करू शकत नाही' - हे वेगळ्या स्तरावर अधोरेखित करणारे.. 'कुठलीही सुव्यवस्थाच विषमतेला दूर ठेवते' हे ठसवणारे.. आणि विषमता सुव्यवस्थेचा अभाव दाखवते हे अधोरेखित करणारे.

म्हणूनच समाजात सकारात्मक सर्जनशील चिंतनाबद्दलची बांधिलकी रुजवण्याचा विचार भारतात होऊ लागला. ही बांधिलकी संरक्षक कवच-कोंदण आहे, ही भावना विचारवंतांमध्ये रुजली. या भावनेनिशी सर्जनशील उंची गाठण्यात जो श्रेष्ठ ठरतो, त्याला नायकत्व बहाल करण्याची अभिरुची समाजापाशी आली. सकारात्मक सर्जनशील चिंतनाचा कृतिशील अभ्यास निरंतर सुरू राहण्याची गरज भासली. या अभ्यासात नकारात्मकतेला दूर ठेवणारे, सकारात्मकतेला पुढे नेणारे प्रशिक्षण आवश्यक बनले. पूर्वस्वीकृत धारणांचा कोष टाळण्याचा विचार वाढू लागला. पुरेशा जागृतीने, हे महत्त्वाचे! हे घडताना परंपरा हा शब्द अस्तित्वात होता-नव्हता, सांगता येत नाही. परंतु सातत्याने 'कोषभेद' करण्याच्या या मार्गालाच पुढे 'परंपरा' म्हटले गेले, हे निश्चित.

ओघानेच, कोषात अडकून रहाणे म्हणजे स्व-विकास रोखणाऱ्या रुढीत अडकणे ठरू लागले. रुढीचे भान बाळगणारी रसिकता समाजात आणणे म्हणजेच विषमतेपासून दूर राहण्याची ताकद पुरवणे. म्हणूनच, परंपरेला पुढे नेणारे, सकारात्मक चिंतनाला प्रेरक ठरणारे जे काही असते, त्यालाच 'सुंदर' मानण्याचे व्रत भारतीयांनी घेतले. त्यातून नकारात्मक विषमतेला जागा न ठेवणारे नवे चिंतन मार्गी लागणार होते...

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 30

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>